नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

Description
?Marathi Motivational Videos, Quotes,
Stories आणखी बरचं काही...?

✨ YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache ✨

✨Admin Contact: @Nmcontactbot✨

✨ Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u✨
Advertising
We recommend to visit

? महाराष्ट्र पोलीस ?
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.?
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 4 months, 1 week ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 4 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 weeks, 3 days ago

1 month, 1 week ago
1 month, 1 week ago

नक्की शेवटपर्यंत वाचा?

आपण आजकाल अशी लोक पाहतो त्यांना कश्याचा मोठेपणा असतो कश्याचा गर्व असतो त्यांनाच माहीत.ते स्वतःलाच खूप भारी आहोत समजतात बघितलं तर त्यांच्याकडे जास्त काहीच नसतं,पण देखावा आणि attitude असा काय दाखवतात की मी काय आता जग जिंकलेले आहे की काय?त्यांनाच माहीत नसतं आपण जगाच्या कोणत्या कोपऱ्यात आहे आणि दुसऱ्याला कमी समजण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतः  खूपच हुशार आहोत असे दाखवतात.स्वतःकडे खूपच काही आहे असे ते दाखवतात. तुम्ही काय आहेत हे इतरांना माहीतच असतं त्यामुळे अस दिखावा करून मिळत काय त्यांनाच माहीत.एखाद्याने काही खरेदी केले ते उगाच जगला दाखवण्याचा प्रयत्न करणार की मी किती मोठा आहे आणि बाकीचे किती तुच्छ आहेत.समजा तुमच्याकडे चांगली गाडी आहे तर इतरांकडे कार असते त्यामुळे दिखावा नसतो करायचं कधी कारण ह्या एवढ्या जगात आपला देश कुठे,त्यात आपलं गाव कुठे?त्यात आपलं स्थान कुठे?मग कश्याला एवढं घमंड करायचा.आपण विचार करू शकत नाहीत एवढे उच्च दर्जाची असतात ते लोक ज्यांना तुम्ही कमी समजता फरक एवढंच असतो तुम्ही दिखावा करता ते दिखावा करत नाही.
............???............
शब्दांकन -B.S Kendre(student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (Whats)
आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवत रहा आवडल्यास नक्कीच शेयर करा✍?

1 month, 1 week ago

जंक्शन
घर हरवलेली माणसं
व.पु. काळे.

तिन पातळांची पसंती झाल्यवर चौथं पातळ रेवतीनं मला पसंद करायला सांगीतल. एका पाठोपाठ एक असा तिचा पातळं निवडण्याचा सपाटा पाहून मी चकित झालो होतो. किंमतीत घासाघीस नाही. रंगात,पोताच्या बाबतीत, कशाकशात चर्चा न करता तीनं पाच पातळं खरेदी केली. माझ्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे पाहायला तिला सवड नव्हती. पाच पातळांची किंमत दुकानदारानं एकशे दोन रूपये सांगितल्यावर ती शांतपणे म्हणाली,  'मी फक्त पंच्याण्णव रूपये देणार आहे'
'माझी खरेदीची पद्धत तुला कशी काय वाटली ?'
'चकित करण्यासारखी आहे.'
'तू' चकित झालास ?'
'छे-छे, दुकानदार चकित झाला!'
'चल !'
'खोटं नाही. त्यानं उगीचच सात रूपये कमी केले वाटतं ? शंभर पातळ पाहायची, रंगाला नावं ठेवायची, पोत वाईट म्हणून कुरकुर करायची, किंमत दहा-दहा वेळा विचारायची आणि शेवटी काहीच घ्यायचं नाही, अशा बायका पहाण्याची त्याला सवय झालेली. हे सगळ टाळून तू त्याचा वेळ व डोकेदुखी वाचवलीस म्हणून त्यानं सात रूपये कमी केले.'      
रेवती मनापासून हसली.
'बरं तुला काही ड्रिंक वगैरे घ्यायचंय ?'
हातातलं पातळांचं बोचकं वर धरत मी विचारलं, 'टिप म्हणून की हमाली म्हणून ?'
'असं म्हणणार असलास तर पुन्हा फोन करते बघ.'
'मला वाटलं होतं की माझा वेळ मजेत गेल्याबद्दल एन्टरटेनमेंट टॅक्स म्हणून तूच माझ्याकडून काही तरी वसूल करशील.
'आज चेष्टा बस. खरं सांग काही हवंय का ?' .. 'आज नको. पुन्हा केव्हातरी साठी आजचे पैसे रिझर्व ठेव.'
तिला तो करार पटला. बसमध्ये बसल्यावर मीच तीला विचारलं,
'ही एवढी पातळं कुणासाठी ?'
'मलाच.'
'एवढी ?'
'हो ! सबंधवर्षाची बेगमी आणि गेल्या वर्षाचा सूड !'
'स्पष्टीकरणाची गरज आहे.'
'काय करणार आहेस तू स्पष्टीकरण ऐकून ?'
'अर्ध बोलून तू काय मिळवणार   आहेस ?'
'जाऊ दे रे ! मिळवत्या बायकांची दुःखं नाही  कुणाला कळायची.'
'आता सगळं सांगावं लागेल.'
'बायका मिळवायल्या लागल्या की नवरे-लोक त्यांच्या कपडयांची विचारपूससुद्धा करत नाहीत. सासूबाई तसल्याच. घरात वन्संसाठी पातळं आणून झाली. स्वतःसाठी झाली. एक-दोघांना आहेर झाले मोठाले. त्यांनाही पातळं झाली. माझी चौकशी सुद्धा नाही.आम्हीच आमचे कपडे आणायचे. गेल्या सबंध वर्षात आपण होऊन कुणी चौकशी केली नाही. आता मीही कुणाची पर्वा करायची नाही असं ठरवलं आहे.'
'तुझ्या रागात मी भर घालतो असं समजू नकोस. पण मला एक सांग, तू नोकरी किती वर्ष करीत आहेस ?'
'हे आठव वर्ष.'
'मग ह्या गोष्टीची जाणीव तुला आजच झाली ?'
'अन्यायाची जाणीव तुलना करायला मिळाली म्हणजे होते. गेले चार महिने वन्संही नोकरी करीत आहेत. गेले चार महिने सतत कौतूक चाललं आहे-नोकरी करते, बिचारी दमते ! मी काय गेली आठ वर्ष रमी खेळायला जाते आॅफिसात ? तिच्यासाठी न सांगता पातळं आणली. एवढी वागण्यात तफावत लेकीसुनेमध्ये ?'
'आता तू पंच्याण्णव रूपये कमी दिल्यावर काय   होईल ?'
'घरात हायड्रोजन बाॅम्ब पडेल.'
'असं ?'
'होय. ह्या स्टेप्स घेण्याची माझी इच्छा नव्हती. ह्याच लोकांनी माझ्यवर तशी पाळी आणली.'
'तुला ती भलतीच गोष्ट लागलेली दिसते
आणि लागणं स्वाभाविक आहे म्हणा.'
'ही एकच गोष्ट लागलेली नाही. रोज लागण्यासारख्या गोष्टीअसंख्य होतात दुर्लक्ष मीच करते. आता मी बंड करणार आहे. एकत्र कुटूंबपद्धतीचे गोडवे गायचे एकीकडे आणि मग पिळवणूक करायची दुसरीकडे ! स्वतःची मुलगी कामावरून परतली की तिला सक्तीनं अर्धा-पाऊण तास विश्रांती. आणि मला कपडे बदलायला, तोंड धुवायला दहा मिनिटं जरी उशीर झाला तरी त्यांच्या कपाळावर आठी.
चहाचा आयता कप तर गेल्या आठ वर्षात मला एकदाही मिळालेला नाही.
ऐकणाऱ्याला ह्या गोष्टी बारीकसारीक आणि क्षुल्लक वाटतील. सांगणाऱ्या माणसालाच ह्या बाबतीत कमी लेखलं जाईलं. पण नुसती कल्पना कर, कामावरून माणूस अगदी दमून यावं, एकच कप चहाची तल्लफ यावी-आणि स्वतः केल्याशिवाय चहा मिळू नये, सांग काय वाटेल अशावेळी ?'

रविवारी राजा सकाळचाच आला.
'केव्हा आलास ?'
'कालच आलो. रेवतीची तार आली होती.'
'राजा, तू एवढा शांत कसा ?'
'हे सारं अपेक्षित होतं.'
'तू ते होऊन देऊ नकोस. रेवतीला परावृत्त कर.'मी अस्वस्थ होत म्हणालो 'मी आत्ताच तिकीटं रिझर्व करून आलो.'
'राजा....'
'त्याला इलाज नाही. केव्हा तरी होणार होतं हे. मला ह्यात नवीन नाही. घरातल्या बाईनं आपलं क्षेत्र बदललं की त्यापोटी दुसरं काय होणार ? संसार कशासाठी करायचा ? संसार म्हणजे काय याच्या व्याख्या जिथं बदलायला लागल्या तिथं एकमेकांच्या नात्याबद्दलचा प्रश्न उद़्भवतोच कुठं ? जेवढ्या जिद्दीनं रेवती नोकरी करते, तेवढी जिद्द तिनं घरात वापरली असती आणि मिळवला तर चांगुलपणा ह्याच लोकांकडून मिळवून दाखवीन असं म्हटलं असतं तर ती तेवढीच कर्तबगार ठरली असती.'

1 month, 2 weeks ago
फक्त जिद्द ठेवा ...!!

फक्त जिद्द ठेवा ...!!

आयुष्याची सुरुवात कधीही आणि

कोठूनही होऊ शकते...

@natemanache

1 month, 2 weeks ago

(एकदा पूर्ण नक्की वाचा)
गोड गोड बोलणारी,तोंडावर आपली स्तुति करणारी माणसे आपल्याला चांगली वाटतात, आवडतात आणि अशी माणसे हवे हवेशी वाटतात परंतु जी माणसे आपल्याला चुकलेले सांगतात,तुमच्या काळजीपोटी बोलतात,थोडे आपला समजून थोडे रागवतातही अशे लोक आपले शत्रू आहेत असे वाटे परंतु खर पाहता जी लोकं हक्काने तुम्हाला समजून सांगतात,बोलतात त्यांनाच तुमची खरी काळजी असते,कारण ते तुमच्या भविष्याचा विचार करत असतात कारण त्यांना तुम्हाला यशाच्या शिखरावर जाताना पाहायचं असतं,
त्यांना तुम्ही मोठं होताना पाहायचं असतं.
  ह्याचा अर्थ असा नाही की प्रत्येक गोष्टीत चुका काढणारे तुमचे हितकारी असणार.नाहीतर आजकाल गोडगोड बोलून फायदा साधून घेणारे आहेत.हे जग Edited आहे इथे दाखवतात एक आणि असतं एक.जवळचे असून पलटून जाणारे खुप मिळतील.त्यामुळे तुम्हाला समजून सांगणारे,बोलणारे व्यक्ती असतील तर त्यांना गमवू नका कारण तेच तुमचे हितकारी असतात.देवदूत असतात ती माणसं जे दुसऱ्यांच्या आनंदाची काळजी घेतात.”
............???............
शब्दांकन -B.S Kendre(student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (Whats)
आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवत रहा आवडल्यास नक्कीच शेयर करा✍?

1 month, 2 weeks ago

@natemanache

??❝ स्वतच्या दुःखाचं ओझ सोबत ठेवून ही दुसऱ्यांना आनंद देणारी माणसं ही परस्थितीशी कायमची जवळीक साधून चालत असतात म्हणूनच ती कायम समाधानी असतात...❞??

1 month, 3 weeks ago

(प्रत्येक स्त्री व पुरुषाने हे लिखाण एकदा नक्की वाचा आणि इतरांना नक्की शेअर करा.?)
विचार करू शकत नाही एवढं वाईट कृत्य घडते तेपण आपल्या पवित्र अश्या भारत देशात हे लज्जास्पद आहे आणि ह्यातून असा प्रश्न पडतो की माणुसकी शिल्लक आहे की नाही?प्रकरण झाल्यास अनेक जण समर्थनात उतरतात,मेणबत्ती काढून मोर्चा काढतात,परंतू जेव्हा खरच गरज असेल तेव्हा किती लोक मदतीला येतात,हे महत्वाचं.सांगायला दुःख होते पण,भारत देश हा महिलांसाठी असुरक्षित आहे.ह्या बाबतीत आपण सखोल विचार करणे गरजेचे आहे कडक शिक्षा करून कायद्यांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
  आता गरज आहे लोकांच्या मतपरिवर्तन करण्याची,जोपर्यंत आपण एका स्त्रीकडे एक माणूस म्हणून पाहणार नाही आणि स्वच्छ नजरेने,दृष्टीने पाहण्याची सवय करणार नाही तोपर्यंत काही सुधारणा होणे अशक्य आहे. स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.मुलांवर लहान वयातच योग्य संस्कार,संस्कृतीचे महत्त्व बिंबवणे गरजेचे आहे.ज्याठिकाणी सांप्रदायिक वातावरण आहे,तिथे असे विचार येतच नाहीत,म्हणून संप्रदायाकडे परत वळणे गरजेचे आहे.त्याबरोबरच भगवदगीता , कुराण,बायबल अश्या पवित्र ग्रंथातील शिवकण अंगी बाळगावी.शिवाजी महाराजांचे इ नेत्यांचे चरित्र सांगावे.महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दाव्येत,सशक्तीकरणास प्रोत्साहन द्यावे.महिलांनी तिच्या सुरक्षेतेसाठी मित्र,भाहू,नवरा काही सांगत असेल तर त्यामागील सुरक्षेचा उद्देश ओळखून तसे राहण्याचा प्रयत्न करावा .
............???............
शब्दांकन -B.S Kendre(student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (Whats)
आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवत रहा आवडल्यास नक्कीच शेयर करा✍?

1 month, 3 weeks ago

@natemanache

जेव्हा सगळं काही सुरळीत चालू असतं तेव्हा कुणीही सकारात्मक विचार करू शकतो. जेव्हा गोष्टी सुरळीत चाललेल्या नसतात, तेव्हा तुमच्या मनाची ठेवण योग्य असणं अधिक आवश्यक असतं. तुमच्या विचारशक्तीच्या जोरावर तुम्ही कोणतीही गोष्ट केवळ इच्छेच्या योगे घडवून आणू शकता. त्यामुळे तुमच्या विचारांच्या सामर्थ्यानं तुम्ही कोणतीही गोष्ट मार्गावर आणू शकता. आपलं चिंतन सुरळीत बनवणं हा आपलं आयुष्य सुरळीत बनवण्याचा खात्रीशीर मार्ग आहे. जेव्हा गोष्टी सुरळीत चाललेल्या नसतात, तेव्हा योग्य रीतीनं विचार करणं अधिक महत्त्वाचं असतं.

Credit goes to writer

1 month, 3 weeks ago

मित्रांनो नाते मनाचे या चॅनेल वर आपल्या
सगळ्यांचे स्वागत आहे.
आपल्या प्रत्येकाच्या मनात कुठेतरी एक कवी किंवा लेखक लपलेला असतोच फक्त गरज असते ती स्वतःला जाणून घायची. तुमच्याकडे जर स्वलिखित लेख, कविता आणि प्रेरणादायी कथा असतील तर मला 

?Contact : @Nmcontactbot ?

वर पाठवू शकता. तुमचे लेख ग्रुप वर तुमच्या नावासहित प्रकाशित केले जातील.

4 months, 1 week ago

?.DON'T JUDGE STUDENTS BY THEIR MARKS.?
(तुम्ही विदयार्थी,पालक असाल तर शेवटपर्यंत लिखाण नक्की वाचा)

नुकतेच काही दिवसापूर्वी बारावी व दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल लागला आणि येणाऱ्या काहीकाळात अनेक स्पर्धापरीक्षांचा निकालही लागेल,खूप जणांना चांगले गुण मिळाले परंतु काहींना कमी गुण मिळाले असतील तर कमी गुण मिळाल्यामुळे काही विदयार्थांना हव्या त्या  कॉलेज,कोर्सेला, जॉबला प्रवेश मिळणे कठीण असेल आणि आपल्यास खूप तणाव जाणवत असेल,मनस्थिती स्थिर नसेल तर कृपया तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.असे अनेक विदयार्थी असतात.ज्यांना पुस्तकातील गणिते,प्रश्न नीट सोडवता येत नसतील पण आयुष्यातील गणिते,प्रश्ने नक्की सोडवतात,त्यांच्यात असे कलाकर आहेत ज्यांना पुस्तकातील आकृत्या नीट रेखटता येत नसतील पण जीवनाची चित्रकला जमत असेल त्यामुळे निराश होऊन आत्महत्या हा पर्याय नसतो.
   एक परीक्षेतील गुण तुमचे पूर्ण आयुष्य कसे आहे हे ठरवू शकत नाही.तुम्ही तुमचे शंभर टक्के दिले असणार तर नाराज होण्याची अजिबात गरजच नाही आहे,आणि निकाल लागल्यास जे गुण आहेत ते कितीही बदल करण्याचा प्रयत्न केला तरीही त्या बदलू शकत नाही.जी परस्थिती आहे त्याबद्दल कितीही विचार केला तरीही तो निष्फळ असतो.हातात असतो तो वर्तमान,भुतकाळातील गोष्टी नव्हे. हातात ग्लास घेवून घट्ट ठेवला तर हातालाच कळ लागेल,तसेच आपण कोणत्याही एका गोष्टीला पकडुन ठेवले तर त्याचा आपल्याच त्रास होतो,त्यामुळे जे जे वाईट घडलं ते सोडून द्यायचं.वाईट काय घडू शकते आपल्याला जे हवे होते ते आपण मिळू शकणार नाही परंतु दुसरे काहीतरी तर मिळेल,आपण जेव्हा मोठ्या ध्येयासाठी प्रयत्न करतो,जर ते मिळाले नाही तर कदाचित दुसरे ध्येय मिळू शकते,तेथून एक नवीन प्रवास चालू करायचा.एक मार्ग जेव्हा  बंद होतो तेव्हा,दुसरे अनेक मार्ग सुरू होतात.
  महत्त्वाची बाब म्हणजे एका विदयार्थ्याची तुल ना इतरांसोबत करणे,त्यांचा गुणांवरुन त्यांची पातळी ठरवणे,ही अतिशय चुकीची पद्धत आहे,एकच मार्ग सर्वांसाठी योग्य नसतो,सर्वच डॉक्टर,इंजिनिअर आणि क्लासवन अधिकारी बनू नाही शकत,प्रत्येकाला आपल्या कुवती नुसार पद,नोकरी,व्यवसाय नक्की मिळेल,पण त्या खुर्चीसाठी अगोदर आपल्याला लायक बनावे लागेल.त्यामुळे आपल्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्याचा प्रयत्न करावा,कारण जिथे आवड असते तिथे सवड असते,आणि त्या प्रवसाचा कंटाळा येत नाही.शेवटी वेळ लागेल पण आपले ध्येय नक्की मिळेल.शेवटी काहीतरी मिळेल,आकाश चोप्रा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.त्यामुळे पुढे चालत जाणे हे महत्त्वाचे.स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही अविश्वसनीय व्हाल..Best of luck
...........????............
शब्दांकन -B.S Kendre(Student)
Telegram -@Bskendre5
Contact-7218160575 (WhatsApp)
आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवा व आवडल्यास शेयर करा.✍?

We recommend to visit

? महाराष्ट्र पोलीस ?
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_❤
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.?
MOB :- 8999553581

मार्गदर्शक - राहुल गाडे (महाराष्ट्र पोलीस)

@dmin :- अपेक्षा सुरेश साळुंखे

@ONLY_KHAKI - जिंकूनच राहणार

Last updated 4 months, 1 week ago

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय नोकरीचे अपडेट्स देणारे टेलिग्राम चॅनेल!
Latest Government Job Portal www.MajhiNaukri.in
https://linktr.ee/MajhiNaukri

Last updated 2 years, 4 months ago

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission

☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275

Follow us on Twitter :- @mpsc_office

Last updated 2 weeks, 3 days ago