Unlock a World of Free Content: Books, Music, Videos & More Await!

छत्रपती शिवाजी महाराज

Description
आयुष्यात महाराज समजून घेण्याचा प्रयत्न करा
कधीच खचून जाण्याची वेळ येणार नाही !
तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय !
लाखो मराठी जनमानसात छत्रपतींचा इतिहास पोहचवण्यासाठीचा खटाटोप आम्ही करत आहोत !
आपली प्रेमळ साथ लाभेल हीच खात्री ❤️
Advertising
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago

3 weeks, 2 days ago
**दिवस कुठला ही असला तरी सुरवात …

दिवस कुठला ही असला तरी सुरवात इथूनच होते.
शक्तीदाता
*🚩***

3 weeks, 3 days ago

जाण्यापूर्वी २५ एप्रिल ला त्याने दिल्लीहून शाहू छत्रपती आणि बाजीराव यांना पत्रे लिहिली ज्यात "हिंदुस्थान चा कारभार चालवण्यास हिंदुपती शाहूच योग्य व्यक्ती आहेत,मोहम्मद शाह याला पुन्हा बादशाह नेमले आहे त्यांचे साथीने कारभार चालवावा" असे नमूद केले. अहमदशाह अब्दालीचा गुरु असलेला नादिरशहा हा अब्दाली पेक्षा क्रूर, विक्षिप्त आणि जिहादी प्रेरणेने भारलेला कडवा राजा होता. जर नादिरशहा बादशाह म्हणून हिंदुस्थानात स्थिरावला असता आणि दक्खनेत जाऊन त्याने मराठ्यांचा पराभव केला असता तर नादिरशहा च्या कडव्या विचारसरणीने हिंदुस्थानचे इस्लामीकरण नक्कीच झाले असते. मराठे जर उत्तरेत गेले नसते, तर संपूर्ण उत्तर हिंदुस्थान नादिरशहा किंवा अबदाली अशा इस्लामिक धर्मवेड्या प्रवृत्तींच्या हाती गेला असता. छत्रपती शाहू यांनी नुसता देशच नव्हे तर धर्म सुद्धा वाचवला भारतातल्या मुघल सत्तेचे संरक्षक बनून त्यांनी 'राष्ट्रधर्मा' ची हि निर्मिती केली. छत्रपती शाहू म्हणजे दुर्दम्य आशावादाचे प्रतीक होते, वडिलांचे लढवय्ये गुण आणि आजोबांचा दूरदर्शीपणा याची सांगड घालून त्यांनी भगवा
महाराष्ट्रातून भारतभर नेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२५ एप्रिल १८०९
कुप्रसिद्ध “अमृतसर संधी”
१८०७ मध्ये रणजितसिंगांनी सतलज पार केले. पंजाबमधील पतियाळा, लुधियाना ही महत्वाची शहरे देखील याच काळात जिंकून घेतली. रणजितसिंग यांची ही विजयपताका बाकीच्या लहान शीख संस्थानिकांना पाहवेना.
त्यांच्याबद्दल जबरदस्त दहशत निर्माण झाली आणि म्हणूनच सतलज पार करून तेथील गावे जिंकल्यानंतर तिथल्या स्थानिक शीख संस्थानिकांनी रणजितसिंग विरुद्ध इंग्रजांकडे मदत मागितली. त्यानुसार इंग्रजांनी रणजितसिंग यांच्याकडे संधी करण्याचा प्रस्ताव पाठवला होता.
महाराजाला हा प्रस्ताव अर्थात मान्य नव्हता मात्र इंग्रजांचा दबाव वाढत चालल्याने २५ एप्रिल १८०९ ची कुप्रसिद्ध “ अमृतसर संधी” झाली पण जरी संधी झाली तरी रणजितसिंग यांचा विजय वारू रोखण्यास त्यावेळी कोणीही समर्थ नव्हते. १८०९ साली जेव्हा “कांगडा” प्रांतावर अमरसिंह थापा या शीख संस्थानिकाने हल्ला केला तेव्हा तेथील शासक संसारचंद्र याने रणजितसिंग याची मदत घेतली.
परिणामस्वरूप कांगडा शत्रूमुक्त झाला आणि त्यावर रणजितसिंग याचं वर्चस्व देखील प्रस्थापित झालं.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२५ एप्रिल १८१८
इंग्रजांनी २५ एप्रिल ते ६ मे १८१८ दरम्यान कर्नल प्रोथर, मेजर हॉल आणि मेजर बॉण्ड रायगडाच्या पश्चिमेस पोटल्याच्या डोंगरावरून वाघ दरवाजाच्या बाजुला  डागले तोफगोळे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

ऐतिहासिक माहिती सादर करणाऱ्या,
शिवविचारांचा जागर करणाऱ्या
'छत्रपती शिवाजी महाराज' Whatsapp group ला
सामील होण्याकरिता या क्रमांकावर मेसेज करा 9809382525 🙏🚩

जय शहाजीराजे, जय जिजाऊ
जय शिवराय, जय शंभूराजे
जय हिंद, जय महाराष्ट्र 🚩**

3 weeks, 3 days ago

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष 📜**

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२५ एप्रिल १६६५
मुघल सरदार दाऊदखान सुमारे ७००० घोडदळ घेऊन किल्ले पुरंदरच्या पायथ्यापासून स्वराज्याच्या नासाडीकरता निघाला. त्याने रोहीडा खोरे, हिरडस मावळ आणि गुंजन मावळ मध्ये धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२५ एप्रिल १६७४
६ जून १६७४ रोजी होणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या राजाभिषेक सोहळ्यासाठी पोलादपुरचे रामजी दत्तो चित्रे या सोनाराने ३२ मण सोनं वापरून सुवर्णसिंहासन घडवले. सिंहासनावर अत्यंत मौल्यवान अगणित नवरत्ने जडवलेली होती.
आजच्या मितीला सिंहासनाचे वजन किलो मध्ये करावयाचे झाल्यास ते १४४ किलोचे भरेल.
त्यावेळचे वजनाचे कोष्टक खालीलप्रमाणे होते.
२४ तोळे म्हणजे १ शेर (जुना तोळा ११.७५ ग्रामचा होता)
१६ शेर म्हणजे १ मण म्हणजेच १ शेराचे चे वजन : ११.७५ ग्राम x २४ तोले = २८२ ग्राम होते.
१ मण चे वजन : २८२ ग्राम x १६ शेर = ४५१२ ग्राम (४.५ किलो) होते.
असे ३२ मण म्हणजे ४५१२ x ३२ = १४४३८४ ग्राम (१४४ किलो).

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२५ एप्रिल १६७४
कालिकतहून सूरत येथे एप्रिल २५ चे जें पत्र रवाना झालें, त्यांत कालीकातकरांनी कळविले की ' शिवाजी एक मूल्यवान सिंहासन बनवीत असून येत्या जूनमध्ये तो स्वतःस राज्याभिषेक करून घेणार आहे. शिद्दीच्या आरमारी सत्तेचा उपहास करून रायगडावर शिवाजी महाराजपद स्वीकारण्याच्या तयारीत आहे; आपण इंग्रजांनी आपल्या हक्काच्या संरक्षणासाठी वकील धाडला पाहिजे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२५ एप्रिल  १६८९
स्वराज्याचे दूसरे छत्रपती, छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांनाही त्याचप्रमाणे कैद करुन ठार करण्याचा औरंगजेबाचा मनसूबा होता. याचीच अंमलबजावणी म्हणुन बेळगावचा मोगल सुभेदार बहादुरखान याने हुकेरीचा देसाई अलगोडा यास अंमलबजावणीसाठी  पाठविलेले पत्र. (दि.२५ एप्रिल  १६८९)
खान बहादुर-हुकेरी परगण्याचा देसाई अलगोंदा-
या वेळी (बादशहाचा) हुकुम झाला आहे की छत्रपती रामराजा महाराज रायरी किल्ल्याहून बाहेर पडून प्रतापगड उर्फ जावळी किल्ल्यावर पोहचला आहे आणि (तेथून) पळून जाऊ इच्छित आहे. त्याला ठार मारणे अथवा कैद करणे जरुर आहे. तो ज्या बाजूने येईल तिथल्या जमीनदारांनी आपल्या हद्दीतील फौजेच्या सरदाराला त्वरीत खबर द्यावी. जर नाही दिली तर ते अपराधी होतील. म्हणुन इथून तुझी सरहद्द पन्हाळ्याला लागून असल्याने तू (रामराजाला) अडवावेस. हेर काढून राजारामाची बातमी सतत कळवीत असावे. जर तो आढळला तर त्वरित रातोरात खबर पोहचवावी म्हणजे हल्ला करुन त्याला कैद केले जाईल.
जर खबर पोहचविण्यात कुचराई करशील व शत्रु तुमच्या हद्दीतुन निघुन जाईल तर ते चांगले नाही. अपराधी व्हाल. या बाबतीत जराही निष्काळजीपणा करु नये व सक्त ताकिद जाणावी. अशा प्रकारे बातमी कळवणे यातच स्वतःची कर्तव्य परायणता जाण. (समासात) दिरंगाई करु  नकोस. तारीख १४ रजब, (जुलूस) सन ३२ स्वतःच्या वकीलाला त्वरित पाठवा.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२५ एप्रिल १६९०
सातारला अजिंक्यताराच्या पायथ्याशी सर्जाखान संताजीकडून पराभूत व कैद.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२५ एप्रिल १६९३
संताजीने अलीमर्दनखानाला कैद करून बदल्यात सुटकेसाठी खंडणीचे एक लाख होन गोळा करण्यासाठी त्याच्या माणसांना भीक मागत फिरायला लावले होते.
२५ एप्रिल १६९३ चे अलीमर्दनखानाच्या लोकांनी औरंगजेब बादशहाला दिलेले एक आर्जव पत्र उपलब्ध आहे. त्या आर्जव पत्रात म्हटलंय कि, " अलीमर्दनखानास मराठ्यांनी पकडून कैदेत टाकले आहे. एक लाख होन खंडणी भरल्याशिवाय मराठे अलीमर्दनखानास सोडायला तयार नाहीत. अलीमर्दनखानाची माणसे हैदराबादेत आलेली आहेत.
अलीमर्दनखानाचे हत्ती आणि इतर जिन्नस विकून खंडणीची भरपाई करण्याचा प्रयत्न त्याचे लोक करीत आहेत. परंतु हैदराबादचे अधिकारी वरील जिन्नस विकण्यास मनाई करत
आहेत."
ह्यावर औरंगजेब बादशहाने हैदराबादचा सुभेदार जानसिपार खान ह्यास लिहून कळविले कि, "अलीमर्दनखानाच्या लोकांस हत्ती आणि इतर जिन्नस विकण्यास आडकाठी करू नये."
अक्षरशः भीक मागून आणि जवळ आहे ते सर्व विकून शेवटी अलीमर्दनखानाच्या लोकांनी पैसे गोळा केले आणि संताजी घोरपड्यांस आणून दिले. मगच संताजीने अलीमर्दनखानाची सुटका केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२५ एप्रिल १७३९
राष्ट्रधर्माचे निर्माते छत्रपती शाहू -
चंबळ च्या उत्तरेस पोचून नादिरशहा ला तिथेच गाठण्याचा बाजीरावांचा मानस होता जेणेकरून नादिरशहा माळव्यात शिरू शकणार नाही. मराठा आणि मोगल हेरांनी उत्तरेत अफ़वा पेरल्या कि शाहूंनी पूर्व,पश्चिम आणि दक्षिणेतून
एकत्रित २ लाखांची फौज बाजीरावांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या रक्षणास पाठवली. या बातमीचा योग्य तो परिणाम होऊन नादिरशहा मराठ्यांच्या भीतीने दिल्ली सोडून इराण ला ५ मे  १७३९ ला निघाला.

1 month ago

यामुळे सिंहासनाच्या चौथऱ्याची स्थाननिश्चिती होते.
   'सिंहासन' आणि 'तख्त' ह्या दोन वेगवेगळ्या संज्ञा होय. सिंहासन म्हणजे तेरा फूट लांब व बारा फूट रुंद असा ओटा, आणि तख्त म्हणजे त्या ओट्यावरील राजाने स्वतः बसावयाचे आसन. ह्या आसनावर शेला आणि गलेफ अशी दोन प्रकारची वस्त्रें घातली जायची. गलेफांतही दोन प्रकार होते. सिंहासनावर चौखांबी मंडप होता. ह्या मंडपाच्या खांबांना खारव्याचे अस्तर असलेल्या मखमलीचे वेष्टन असे व त्याचे माप नऊ गज म्हणजे २५ फूट होते. ह्या सिंहासनाच्या मंडपास छत म्हणजे झालर असलेला चांदवा लावलेला होता. हा चांदवा किनखापी तर झालर ताफत्याची असायची. ह्या किनखापी चांदव्यास गजनीचे अस्तर असे. रोज संध्याकाळी सरकारी माणसे सिंहासनाजवळ जमून सिंहासनास मुजरा घालीत असत व तेथे दिवटी लावीत असत. येथे रात्री सतत दिवटी असे. गडावरच्या इतर काही ठिकाणांप्रमाणेच तख्ताजवळही रात्रभर दिवा जळत असावयाचा, असा शिरस्ताच (नियम) होता. तख्ताजवळ मशालेस पोत म्हणूनही खर्च पडला आहे. ह्या सिंहासनाची दररोज पूजा होत असे. त्याचा 'तख्त पुजारी' म्हणून 'महाराजांचे तख्ताचे पूजेस फरास' असा निर्देश आला आहे.
    सिंहासनाच्या व्यवस्थेचा आणखी विशेष म्हणजे सिंहासनासमोर दरवर्षी कीर्तन होत असे. हें कीर्तन करण्याचे काम बिरवाडीच्या योगी घराण्याकडे वंशपरंपरागत होते. ह्या कीर्तनकारास जमीन इनाम दिली होती. हे कीर्तन प्रतिवर्षी निरनिराळ्या तिथींस होत असे. उदाहरणार्थ, जन्माष्टमीचा उत्सव सिंहासनाजवळ होई. इ.स. १७७८ मध्ये या उत्सवास १५ रु. खर्च आला. या उत्सवास गोरेगावकर हरिदास बोलावीत. त्यास ५ रु. बिदागी मिळे.
   सिंहासनाजवळ केवळ सिंहासनाचाच म्हणून नगारखाना इ.स. १७९७ पासून नाना फडणीसांनी सुरू केला. ह्यासंबंधीचा उल्लेख - "रा. बालाजी जनार्दन फडणीस माहाडास आले, ते तेथून किल्ला पाहाण्यास आले ते समई शिवाजी महाराजांचे तख्ताजवळ नगारखाना ठेवावयाची परवानगी सांगितली त्यावरून सन सवा तिसैनापासून ठेविला." सन सवा तिसैन म्हणजे शके १७१८, इ.स. १७९७. ह्या नगारखान्याच्या खर्चाची वार्षिक नेमणूक १३०० रु. असे. नाना फडणीसांनी सिंहासनासमोर नगारखाना ठेवण्याची जी खास व कायमची व्यवस्था केली, तिचे स्वरूप पुढीलप्रमाणे - २ सुर्णाजी, १ तुतारजी, २ कर्णाजी, २ दमामजी, १ डफगर, १ झांजवाला, २ घड्याळजी, ३ नगारजी व पेलेदार, १ नगारे करणार इतकी माणसे कायम नेमली. इ.स. १८०७-०८ मध्ये त्यांचे वार्षिक वेतन १२०० रुपये इतकेे होते.
   तख्तापुढे सिंहासनाचा म्हणून स्वतंत्र चौघडा होता व तो ठराविक वेळीं गर्जत असे. तख्तापुढे दरवर्षी एक बकरे बळी म्हणून दिले जाई. सिंहासनाजवळ राजहुडा होता व तेथे स्वतंत्र पाहारा असे. सिंहासनाच्या चौथऱ्याची जपणूक एखाद्या दैवताप्रमाणे होत असे. अश्या प्रकारे एखाद्या जागृत व तेजस्वी देवस्थानाप्रमाणे रायगडावरील शिवछत्रपतींच्या राजसिंहासनाची व्यवस्था उत्तर पेशवाईत ठेवली गेली होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१९ एप्रिल १८१८
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी किल्ले आणि महत्वाची शहरे ताब्यात घेतली. त्यात १९ एप्रिल रोजी नाशिक शहराचा पूर्ण ताबा कॅप्टन ब्रिजने मिळवला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१९ एप्रिल १९१०
क्रांतिवीर अनंत कान्हेरे, क्रांतिकारक कृष्णाजी गोपाळ कर्वे, क्रांतिकारक विनायक नारायण देशपांडे यांना नाशिकाचा कलेक्टर जॅक्सन याच्या हत्येसंदर्भात  फाशी दिली गेली.

अनंत कान्हेरे हा गणेश(बाबाराव) दामोदर सावरकर आणि
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या अभिनव भारत ह्या अंतराष्ट्रीय सशस्त्र क्रांतीकाराक संघटनेचा एक सदस्य होता. कलेक्टर जँक्सन बाबारावांच्या अटकेसाठी
जवाबदार होता. त्याची नाशिक मधून मुंबईत बदली होणार होती. त्याच्या निरोपासाठी नाशिकमधल्या विजयानंद थिएटरमध्ये शारदा ह्या नाटकाचा प्रयोग ठेवला होता . जँक्सन मराठी नाटकाचा चाहता होता म्हणून तो नाटक पाहण्यासाठी येणार होताच. नाटक सुरु होण्याची वेळ
झाली असता सर्वजण आपापल्या जागेवर स्थानपन्न
होत असताना अनंताने जँक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जँक्सन जागीच ठार झाला. ती पिस्तुल स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडनमधून गुप्तरीतीने पुस्तकामध्ये ठेऊन पाठवलेल्या २२ ब्राऊनी बनावटीतील
पिस्तुलांपैकी एक होती. अनंताला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे ह्या समवयस्कर साथीदारांची जोड मिळाली. जँक्सनचा वध केल्यानंतर अनंत आपल्या जागेवर शांतपणे उभा राहिला . त्याला अटक करण्यात आली . कान्हेरे , कर्वे , आणि देशपांडे ह्यांच्यावर खटला भरण्यात आला . २० मार्च १९१० रोजी त्यांना फाशी ठोठावण्यात आली . आणि १९ एप्रिल १९१० या दिवशी ठाण्याच्या तुरुंगात फाशी देण्यात आली .

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

Instagram 👇**
@sri_srimantyogi_

( Search of true history )

जय शहाजीराजे, जय जिजाऊ
जय शिवराय, जय शंभूराजे
जय हिंद, जय महाराष्ट्र 🚩**

1 month ago

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष 📜**

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१९ एप्रिल १६७३
छत्रपती शिवाजी महाराजांची  हुबळीवर स्वारी ! अली आदिलशहा २४ नोव्हेंवर १६७२ रोजी मरण पावला. त्याचा सात वर्षांचा मुलगा सिकंदर आदिलशहा गादीवर आला. तेव्हा विजापूरचा सरदार रुस्तुम जमान याने त्याच वर्षी बंड केले. विजापूरच्या अंतर्गत गोंधळाचा फायदा घेऊन महाराजांनी विजापूर राज्यावर १६७३ मध्ये आक्रमण केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१९ एप्रिल १७१९
फारुखसियर बादशाहची हत्या
फेब्रुवारी १७१९ ला लाल किल्ल्यातली सगळी बादशाही फौज आणि पहारेकरी हटवण्यात आले, मराठे आणि हुसेन अलीने स्वतःची माणसे नेमली. २८ तारखेला हरम (शयनकक्षात) मध्ये लपलेल्या फारुखसियर बादशाहला पकडून दरबारात आणले गेलॆ कुतुब उल मुल्क सय्यद अलीने बादशहाचे डोळे काढले आणि बादशहाला बंदीखान्यात टाकले. रफी ऊत दर्जतला नवीन बादशाह घोषित करण्यात आले. फारुखसियर ने बंदीखान्यातून बंडाळी चे प्रयत्न केले, दिल्ली शहरातसुद्धा प्रचंड अशांतता माजली होती. बादशाह समर्थकांनी पुन्हा किल्ल्यावर ताबा मिळवला तर सय्यद बंधू हुसेन अली आणि हसन अलीं यांचे मरण निश्चित होते आणि मराठ्यांची मोहीम सुद्धा फत्ते होणे अशक्य झाले असते. १९ एप्रिल १७१९ रोजी बादशाह फारुखसियरचे मुंडके कापून त्याला संपवण्यात आले. नवीन बादशहा रफी ऊत दर्जतकडून मराठ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या महाराणी येसूबाईंची सुटका झाली, मराठे पुन्हा साताऱ्याला परतले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१९ एप्रिल १७३६
सिद्दी साताचा पराभव
छत्रपती शाहूंनी चिमाजी आप्पा, उदाजी पवार व पिलाजी जाधव यांस सिद्दी साताचा आळा घालण्यासाठी कोंकणात पाठविले. मानाजी आंग्र्यांनी चिमाजीस साथ दिली. १९ एप्रिल १७३६ ला रेवासच्या खाडीत सिद्दीची व मराठ्यांची लढाई झाली. तीत सिद्दीचे १,३०० व मराठ्यांकडील ८०० लोक पडले. सिद्दी सात मारला गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१९ एप्रिल १७९७
रायगडावरील शिवछत्रपतींच्या सिंहासनाचा गलेफ तयार केला
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही रायगडच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची आणि गौरवशाली घटना आणि शिवछत्रपतींच्या तख्ताची म्हणजे सिंहासनाची जागा ही रायगडावरील सर्वात महत्त्वाची आणि पूजनीय जागा. दिनांक ६ जून १६७४ रोजी रायगडावर महाराज सिंहासनाधिश्वर झालें. पुढें इ.स. १६८९ मध्यें रायगड मोगलांच्या ताब्यात गेला. नंतर १७३३ मध्यें रायगड श्रीपतराव पंतप्रतिनिधींच्या करवीं छत्रपती शाहू महाराजांकडे आला. तेव्हा पासून रायगडावरील सिंहासनाची व्यवस्था चालू झाली. इ.स. १७३५ पासून १७७२ पर्यंत रायगड तालुका हुजूरचा प्रदेश होता. शत्रूने स्वारी केल्यावर, त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी पेशव्यांची होती; पण कारभारी नेमणे, तालुक्याचे जमाखर्च पाहणे वगैरे गोष्टींबाबत पेशव्यांस अधिकार नव्हता. शाहू महाराजांनी या तालुक्याचा कारभार यशवंत महादेव यांकडे दिला होता. छत्रपतींची राजधानी रायगडाहून हलल्यामुळे रायगडाचे राजकीय महत्व कमी झाले होते. मात्र तरीही रायगडाची व्यवस्था अत्यंत चांगल्या प्रकारे ठेवलेली होती. शिवकालीन दप्तरातील अनेक तत्कालीन कागदपत्रें याची पुष्टी देतात. ह्या कागदपत्रांत शिवछत्रपतींच्या सिंहासनाची जी व्यवस्था आढळतें ती कौतुकास्पद आणि जाणून घेण्यासारखीच आहे.
इ.स.१७७३ मध्यें पेशव्यांनी सिंहासनाबाबत काही गोष्टी आणि रिवाज कायमचे ठरवून टाकले. सिंहासनास चार खांब होते. सिंहासन गजनी, किनखाप, ताफता अश्या बहुमूल्य कापडाने आच्छादिले जात असे. १६ मार्च १७७३ रोजीचा सिंहासनाच्या कापडाच्या खर्चाचा हिशेब उपलब्ध आहे. एकूण १६०८ रुपयांचे कापड २२८ रु. गजनी, २२० रु. ताफता, ८१२ रु. किनखाप, १६ रु. खारवे आणि ३३२ रु.ची मखमल अशा प्रकारे खर्ची पडले. सिंहासनाच्या बैठकीचा भाग व तलाव्याचा भाग यांस कापडण्यासाठी हा खर्च पडला. खर्चास सरकारी मंजुरी मिळत असे. त्यानंतर बारा वर्षांनी हा सगळा वस्त्रसंभार जीर्ण झाल्यामुळे इ.स. १७८६-८७ मध्ये पुन्हा याच स्वरूपाचा खर्च झाला. नंतर १९ एप्रिल १७९७ रोजी पुन्हा सिंहासनाचा गलेफ तयार केला. यावेळी सिंहासनाच्या खांबास लाल मखमल वापरली होती. इ.स. १७९७ मध्ये सिंहासनास २७३८ रुपयांचे कापड खर्ची पडले. त्या कापडाचा तपशील असा, १३९८ रु.चे किनखाप, ५३८ रु. गजनी, २०८ रु. ताफता, २५ रु. खारवा व ५७० रु.ची मखमल. हे कापड किती लांबीरुंदीचे लागले हेही गजवार दिले असल्यामुळे त्यावरून सिंहासनाची लांबीरुंदी अजमावता येते आणि ती आज सिंहासन म्हणून असलेल्या स्थलाच्या मोजमापाशी जमते. कागदपत्रांत सिंहासनाच्या कापडाची लांबी ५ गज ४ तसू (अदमासे १५ फूट २ इंच) व रुंदी ४ गज ४ तसू (अदमासे १२ फूट) दिलेली आहे. प्रत्यक्षात सिंहासनाच्या चौथऱ्याची लांबी १३ फूट व रुंदी १२ फूट आहे. अर्थात कागदांतील कापड अधिक आहे. पण ते सिंहासनावर घालायचे कापड आहे त्यामुळे ते साहजिकच सिंहासनापेक्षा मोठेच असणार.

1 month ago

फिरोजशाहाने तात्याला सोडल्यामुळे, तात्या दोन स्वयंपाकी ब्राम्हण व एक मोतदार यांच्यासह शिंद्यांचा सरदार मानसिंग याच्या आश्रयास गेला; परंतु मानसिंगाच्या विश्वासघातामुळे जनरल मीडने तात्याला कैद केले. त्याला प्रथम सीप्री येथे नेण्यात आले. त्याची धैर्य व गंभीर वृत्ती शेवटपर्यंत ढळली नाही. सतत पराभव होऊनही तो शेवटपर्यंत डगमगला नाही. १८ एप्रिल १८५९ रोजी तात्याला फाशी देण्यात आले. तात्याबरोबरच १८५७ चा उठावही समाप्त झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१८ एप्रिल १८९८
जुलमी प्लेग अधिकारी रँड याचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

Instagram 👇**
@sri_srimantyogi_

( Search of true history )

जय शहाजीराजे, जय जिजाऊ
जय शिवराय, जय शंभूराजे
जय हिंद, जय महाराष्ट्र 🚩**

1 month ago
छत्रपती शिवाजी महाराज
1 month ago

मृत्यू का गरजेचा आहे...??

एका राजाने शहराबाहेर,एका वृक्षाखाली बसलेल्या साधूला विचारले,"साधूमहाराज,मला अमर करू शकेल अशी दिव्य वनौषधी किंवा चांगले रसायन तुमच्याजवळ आहे का?" साधू म्हणाला,"हे राजा,हा समोरचा व त्यापलीकडील असे दोन पर्वत ओलांडून गेलास,की, तुला एक सरोवर लागेल.त्याचे पाणी तू पी, म्हणजे अमर होशील."ते दोन पर्वत ओलांडून राजा त्या सरोवरापाशी गेला.
त्याचे पाणी पिण्यासाठी आपल्या हाताची ओंजळ करून सरोवरावर तो वाकला.तेवढ्यात त्याच्या कानावर कुणी तरी कण्हत असल्याचा आवाज आला.पाणी पिणे बाजूला ठेवून राजा आवाजाच्या दिशेने गेला. एक जर्जर माणूस एका झाडाखाली आडवा पडून कण्हत असलेला त्याच्या दृष्टीस पडला. राजाने त्याला कण्हण्याचे कारण विचारले.तो म्हणाला,"या सरोवराचे पाणी प्यायल्यामुळे मला अमरत्व आले. परंतु वयाची शंभरी ओलांडताच माझ्या मुलाने मला घराबाहेर हकलून दिले.गेली पन्नास वर्षे मी या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्षित अवस्थेत तळमळत पडलो आहे. आता माझी मुलं तर मेलीच,पण नातवंडेही मरायला टेकली असतील.हे बघावे लागू नये, म्हणून गेली पाच वर्षे मी अन्नपाण्याचा त्याग केला आहे. तरीही मी मरत नाही." त्या वृद्धाची करुण कहाणी ऐकून राजा मनात म्हणाला,"छे! नुसत्या अमरत्वाला काही अर्थ नाही. म्हातारपणाशिवाय जर अमरत्व मिळालं,तरच त्यात मजा आहे. आपण त्याबद्दल साधूला माहिती विचारू.त्याने साधूकडे पर्याय मागितला.साधू म्हणाला,"ज्या सरोवराकडे तू जाऊन आलास ना,त्याच्यापुुढे असलेला डोंगर ओलांडून तू पलीकडे गेलास,तर पिवळ्या जर्द फळांनी भरलेला एक वृक्ष तुला लागेल.त्या वृक्षाचे एक फळ तोडून तू खा.म्हणजे तुला म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळेल." साधूच्या सांगण्या प्रमाणे राजा त्या वृक्षापाशी गेला. त्याने एक पिवळे धमक फळही काढले.आता तो ते फळ खायला सुरुवात करणार,तोच जवळपास भांडण सुरू झाल्याचा आवाज कानावर पडला.एवढ्या दूर येऊन कोण भांडत असेल,या विचाराने राजा त्या लोकांजवळ गेला.तिथे त्याला चार तरुण आढळले. त्यातल्या एकाला राजाने भांडणाचे कारण विचारले,त्यावर तो म्हणाला,"आता मी अडीचशे वर्षांचा आहे.तरी माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले तीनशे वर्षांचे माझे बाबा,पूर्वापार मालमत्ता माझ्या स्वाधीन करत नाहीत.मग त्यांच्याशी भांडू नको तर काय करू ?" राजाने युवकाइतक्याच तरुण दिसणाऱ्या दुसऱ्या युवकाला विचारले,तर तो म्हणाला,"अहो,माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले हे माझे साडे तीनशे वर्षांचे वडील आहेत. ते मला संपत्ती देत नाहीत,तर मी तरी मुलाला कुठून संपत्ती देऊ सांगा."
साडे तीनशे वर्षांच्या तरुणाकडे राजाने प्रश्नार्थक दृष्टीने पाहिले असता,तो म्हणला,"मी तरी संपत्ती कुठून देणार ? ही चूक माझ्या वडिलांची आहे.ते आता ४०० वर्षांचे आहेत."
यावर राजा म्हणाला,"पण एवढी संपत्ती असताना तुम्ही डोंगर दऱ्यांमध्ये का वास्तव्य करताय ? यावर पणाजोबा म्हणाले,"आमच्या घरात दिवस रात्र मालमत्तेवरून भांडणे होत असल्याने गावकऱ्यांनी आम्हाला गावाबाहेर हाकलून दिले आणि आम्हाला इथे राहावे लागत आहे."

तो प्रकार पाहून राजा म्हणाला, म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळाले,तर तेही नकोच.कारण ते जास्त भयंकर आहे.राजा साधूजवळ परत आला आणि म्हणाला,"तुम्ही मला मृत्यूचे महत्त्व पटवून दिलेत.मृत्यू आहे म्हणून जगात प्रेम आहे,अन्यथा माणसेच माणसांच्या जीवावर उठली असती."

साधू म्हणाला,"मृत्यू टाळण्यापेक्षा मिळालेला दिवस आणि मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगून घे.त्यातच खरा आनंद आहे आणि मृत्यूनंतर उत्तम गतीही आहे."

स्वतः बदला...जग बदलेल
१)स्नान करताना नाम घेतले तर ते तीर्थस्नान' होईल.
२) भोजन करताना नाम घेतले तर तो 'प्रसाद' होईल.
३) चालताना नाम घेतले,
तर ती 'तीर्थयात्रा' होईल.
४) स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो 'महाप्रसाद' होईल.
५) झोपताना नाम घेतले
तर ती 'ध्याननिद्रा' होईल.
६) काम करताना नाम घेतले तर ते कर्म 'भक्ती' होईल.
७) घरात नाम घेतले,
तर ते घर मंदिर' होईल.

-- प्रा. माधव सावळे

1 month ago

एक अनुभव : तुम्ही सगळे किंवा तुमच्यातले बरेचजण इन्स्टग्राम किंवा इतर अँप्स वापरत असतीलच. आपल्याला त्यावर अनेक ज्ञान देणारे , लिखाण करणारे , कविता करणारे थोडक्यात आवडता content टाकणारी मंडळी दिसत असतील. थोडक्यात अशी अमाप लोक आहेत - अमाप माध्यमे आहेत पण हे लक्षात घ्या तुम्ही जर उठ सूट सतत जे येईल ते वाचत असाल... कोणाच्या एका पोस्टवरून ते लिहितो ते भारीच असं समजत असाल आणि नंतर पुढे जाऊन तुम्हाला तो माणूस वेगळा आहे असंही जाणवू शकतं ...
थोडक्यात तुम्हाला तुम्ही काय पहावं काय वाचावं कोणाला follow करावं याबाबत जागरूक रहायला हवं आणि नसाल तर काय होईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ? ऐका

तुम्ही फक्त एका गोंधळात रहाल कारण जगात लोक भरपूर आहेत. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आहेत. एवढे सगळे विचार तुम्ही वाचताय - scroll करताय. अशाने तुम्ही फक्त गोंधळून जाल आणि तुमच्या डोक्यात विचारांचा गोंधळ होईल. त्यामुळे विचारपूर्वक माणसं निवडा. आपण कोणाला follow करायचं , कोणाचं वाचायचं हे ठरवा. नाहीतर सध्या होतं काय reel वर नेत्याची रील पाहिली की आपल्याला वाटत आपण अस व्हावं, कोणाला award भेटताना पाहिलं की वाटत अस व्हावं , कोणत्या भाई ची ठार अन माफिया रील दिसली की आपल्याला वाटतं तस व्हावं ! थोडक्यात हे वाटणं क्षणिक असतं आणि आपल्याला काही वेळाने काही दिवसांनी " आपल्याला अस नाही व्हायचं हे सुद्धा जाणवतं " त्यामुळे नुसते गोंधळात राहू नका. Social media वर व्यवस्थित खेळायला शिका. पहायला शिका. शांत रहा. स्थिर रहा. स्वतःच्या आयुष्याची पाने कशी असावीत कशी रंगवावीत हे स्वतः ठरवा. थोडक्यात एकंदरीत नुसतं काहीतरी पाहत रहायचं वाहवत रहायचं ही सवय लावून घेऊ नका आपल्याला काय आवश्यक आहे आपण काय पहावं या सगळ्या गोष्टीकडे जागरूकतेने पहाल तेव्हा स्थिर राहून social media चा आनंद घेऊ शकता 🙌

मी जेव्हा social media वर पोस्ट करायला जातो. तेव्हा मी इतर काय करतात पाहत नाही. मी माझं टाकून येतो म्हणजे की मी वाहवत नाही. मला माहित आहे तिथे नक्की काय करायचं आहे. तस तुम्हीही अगदी आपल्याला तिथे किती वेळ द्यायचा आहे ? त्या वेळात काय पहायचं आहे ? काय पहायला हवं ? इत्यादी गोष्टींबद्दल प्रत्येकाने जागरूक रहायला हवं हा माझा अनुभव मी share केला आहे. हे अनुभव हिताचे आहेत पण प्रत्येकालाच ते पटत असतील असंही नाही. त्यामुळे काळजी नसावी ज्याला हिताचे वाटेल त्याने बुद्धीत साठवावे बाकीच्यांनी सोडून द्यावे ! नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे!

-- ✒️AM

3 months, 2 weeks ago
We recommend to visit

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक

Last updated 1 month, 1 week ago

Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1

Last updated 6 days, 23 hours ago

Last updated 3 weeks, 2 days ago