𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 1 month, 3 weeks ago
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 2 weeks, 6 days ago
Last updated 1 month, 1 week ago
मोठ्या पडद्यावरची आपली कहाणी
काल परवा “यथावकाश” पाहण्यात आला…
“कहाणी स्पर्धा परीक्षा वाल्यांची” असं म्हणत जे काही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ते ते सगळं कमी अधिक प्रमाणात प्रत्येक aspirant ने अनुभवलेलं असतं ..कोविडच्या काळात तर स्पर्धा परीक्षा वाल्यांच भवितव्य फारच अंधारात गेल्यासारखं झालं होत..कोविडच्या काळात aspirants ची झालेली अवस्था ,घुसमट या सगळ्यातून आपण गेलो असून आज त्या काळ्याकुट्ट अंधारानंतरचा लख्ख उजेडही अनुभवत असल्याची नव्याने जाणीव झाली..सिनेमातील काही गोष्टी फार रिलेटेबल वाटल्या..दर महिन्याला आईला पैसै मागताना विजयला जसं जीवावर यायचं किंवा किती दिवस आपली financial dependency चालणार हे सगळ्याच aspirant ला वाटतं असतं irrespective of financial background of family…दुसरी भावलेली गोष्ट म्हणजे दोस्तांची चौकडी..परीक्षा जवळ येतेय,यावर्षी गुलाल आपलाच,रिव्हीजन करायला हवी ,टेस्टसिरीज वगैरे हे सगळे मित्रांमधे चालणारे संवाद आपणही रोज करत असतो की..स्पर्धा परीक्षेचा प्रवास ज्यांच्या सोबत शेअर केला अशा सर्व मित्रमंडळीची नक्की आठवण होणार सिनेमा पाहतांना..कोविडच्या काळात परीक्षेवर आणि पर्यायाने भवितव्यावर आलेली टांगती तलवार स्वतः अनुभवली होती , पूर्वपरीक्षेची पुस्तक घेऊन पुण्यातून घरी गेलेली मी नंतर घरीच राहिली ,पुण्यातून नंतर बाकीची पुस्तकं आणि सामान आणायला चार पाच महिन्यांची वाट पाहावी लागली होती..सुदैवाने मी तरी घरी जाऊन अभ्यास करु शकली होती ,कोविडच्या काळात घरी गेलेल्या अनेक मैत्रिणी नंतर या परत पुण्यात काही परतल्या नाहीत ,वैदेहीसारखं त्यांनाही “लग्न” करावं लागलं..”लग्न करण्यासाठी पोस्ट नाही ,प्रेम असावं लागतं” या वैदैहीच्या वाक्याची धार कोविड काळात परिस्थितीसमोर काही चालली नाही ,कितीतरी प्रेमकहाण्या या झंझावती कोविड वादळामुळे अपूर्ण राहिल्या असतात देव जाणे…माणसं आवडू लागली की ठिकाणं आवडू लागतं तसं झालयं पेठेच..स्वप्न खुणावणारी पंढरी, कानाकोपर्यातून येणारे aspirants,कधीतरी जीव लावणारा घरमालक, रोजचे नाश्ता चहाचे पॅांईट,ओळखीचे रस्ते आणि ठिकाण चित्रपटात पाहायला एक वेगळीच मजा येते..वर्षानुवर्षे प्रवास जसा वाढतो तसं मनावर निराशेचं मळभ दाटायला लागतं ,घुसमट ,एकटेपण ,अपेक्षांचं ओझं ,जगाच्या लेखी मेहनतीला शुल्लक किंमत,बिकट होत जाणारी आर्थिक परिस्थिती हे सगळं होत असतांना वाढत जाणारी स्पर्धा ,परीक्षेला न देता आलेला न्याय ,तारुण्यसुलभ बाबी ,व्यसन या सगळ्यात आपले aspirants स्वतःलाच हरवून बसतात..अधिकारी व्हायचं आणि लाल दिव्याच्या गाडी याच्याशी जुळवुन ठेवलेल्या इमोशन्स “प्लॅन बी “ कडे सहजासहजी वळू देत नाहीत ..मग कुणीतरी गुरु भेटावा लागतो ,जो सांगतो ,शिकवतो..”सूर्य प्रकाशच देतो अस काही नाही ,काजवाही अंधाराला चिरतोच की” ..अट्टाहास असावा पण “स्व” धोक्यात येईल स्वप्नांचा अट्टाहास नसावा…साधन आणि साध्य याची कन्सेप्ट क्लियर असली की माणूस साधनांच्या आहारी न जाता साध्यासाठी जगणं सुरु करतो जसं चित्रपटातला विजू करतो ..कधी कुठे न बोलली गेलेली कहाणी मोठ्या स्क्रीनवर पाहायला वेगळीच मजा येते ..जुने दिवस आठवतात..लाखोंच्या गर्दीतून शेकडोत आलो याचं हायसंही वाटतं पण त्याचवेळी मागे राहिलेल्यांना हात आणि साथ देण्याचा निश्चयही दृढावतो…”यथावकाश”च्या माध्यमातून आपली कहाणी मांडण्याच्या प्रयत्नासाठी टीम यथावकाशचे खूप खूप अभिनंदन आणि आभार सुद्धा…
~©️पुनम
अभ्यासातून विरंगुळा म्हणून एकदा नक्की बघाल: https://play.vdojar.com/yathavkash
राज्यसेवा पूर्वचे शेवटचे ४४ दिवस.
Objective पॅटर्न झाला तेव्हाचा जल्लोष,उत्साह अभ्यासात टिकून आहे ना अजून..
असायलाच पाहिजे
मागची ही audio ऐकू शकतात गरज वाटल्यास..
Sincere efforts + Disciplined, planned study is mandatory✅
पुण्यातील aspirants उद्या संध्याकाळी भेटूयात का थोडावेळ ?ठिकाण सुचवू शकता .!
आपल्या यशापयशात आपल्यासोबत सावलीसारखी उभी असणारी आपली आई… कधी पाहिलय का तिला थकताना… कधी पाहिलय का तिला हिम्मत हरताना.. आपल्या कोणत्या परीक्षेचा निकाल गेला तर तिला बोलताना काय भाव असतो तिचा.. तिला परीक्षेचा काही कळो अथवा ना कळो..आपलं लेकरु नाराज झालं की तीही…
“नोकरी वगैरे”
गेल्या दोन आठवड्यात सारखेच कोणते ना कोणते निकाल लागताय…लोकांचे गुलालाचे स्टेटस संपता संपेना…अर्थात संपूही नये…”नोकरी” नावाच बहुप्रतिक्षीत लांबलेलं प्रकरण संपायला आल्याचा सुस्कारा…थोडा विचार केला ..काय घेऊन येते ही नोकरी नावाची गोष्ट आपल्या आयुष्यात ..? यावर विचार करतांना मला माझा बाप आठवतो ..स्वप्नं वगैरे मोठी असावीत नक्की पण स्वप्नांचा नाद तेव्हाच करता येतो जेव्हा जीवनात नोकरी नावाचं स्थैर्य आहे ..बापाच्या नोकरीमुळे मला ते स्वप्न पाहण्यास सक्षम केलं..जर बाप नोकरीला नसता तर कदाचित गोष्टी अवघड गेल्या असत्या नक्कीच..जगाशी प्रत्येक संधीसाठी भांडावं लागलं असतं (तुमच्यापैकी अनेक जण हे करत असतील ना आता?) कोणत्या एका पिढीने नोकरीची सोय करायची असते मग पुढच्या पिढ्या स्वप्नांचा नाद करु शकता..याचा अर्थ बिलकूल नाही स्वप्नं पाहणं कुण्या एका पिढीची मक्तेदारी आहे असं ..पण सर्वसामान्य कुटुंबांचा इतिहास
बघता कुटुंबाची सामाजिक ,आर्थिक प्रगती करण्याचं सर्वात सोप्पा मार्ग म्हणजे नोकरी …अर्थात किती सोप्पा ,किती अवघड हे ज्याच्या त्याच्या संघर्षावर अवलंबून असतं ..”स्वतः” ला सिध्द करु इच्छिणार्या सर्व धडपडणार्या माणसांचा जिव्हाळ्याचा विषय नोकरी …आपली नोकरी आपली ओळख असते,तिच्यावर आपल्या कुटुंबाची गुजराण खूप चांगल्या पध्दतीने होऊ शकते ,आईवडलांना मुलांच्या सेटलमेंटची जी चिंता वाटत असते ना ती दूर करता येते,आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य Secure करता येत आणि संसार नावाची जबाबदारी अंगावर पडण्याआधी मनसोक्त जगता येतं ती नोकरी कारण आधी आर्थिक फार चिमटे सोसलेले असता ..मुलींसाठी तर नक्की सांगेल,”आपण नक्की सासरचे की माहेरचे ? , या प्रश्नाचं एक चांगल उत्तर “आपण आपल्या नोकरीचे” कुणी असो नसो तुझी नोकरी तुझी असते *“ जगण्याच्या कक्षा रुंदावतात,चार भिंतीच्या पलीकडचं जग जाणता येतं ,नोकरीच्या माध्यमातून कुठल्यातरी क्षेत्रात भरीव योगदान देण्याची संधी मिळते ..शून्यातून विश्व नक्की निर्माण करता येतं पण सगळ्यांना ते शक्य नाही ,आपली नोकरी म्हणजे शून्यातून आपला एक तरी उभारुच शकतो ..इति नोकरीचा महिमा सुफळ संपन्न💯*✨
_सहज_सुचलं_ते_लिहिलं
आयुष्याच्या प्रश्नांपुढे परीक्षेचे प्रश्न खूप छोटे असतात.आयुष्याचे प्रश्न हीच परीक्षेचे प्रश्न सोडवण्याची सर्वात मोठी मोटिव्हेशन असू शकते ..कुणाचे काय प्रश्न असतील सांगू शकत नाही पण या प्रश्नांतून मनात पेटलेली चिंगारी स्वस्थ बसू देत नाही आणि मग अभ्यासच होत नाही ,मन लागत नाही ,मोबाईल वगैरे वगैरे सगळं थिल्लर शौक वाटतात…कारण आतून आलेली मोटिवेशन फार जालीम उपाय आहे सगळ्या प्रश्नांवर..💯
_संघर्षकहाण्यी_ऐकाव्या_तेवढ्या_कमी
आयुष्यात काही प्रश्न अनुत्तरितच बरी असतात..उत्तर शोधायला गेलं की त्रास होतो..नशीब आणि कर्म याचा ताळमेळ लागता लागत नाही त्यामुळे सगळेच हिशोब मांडत बसायचे नसता..आयुष्यात काही बाबतीत “पदरी पडलं पवित्र “ झालं अस म्हणत पुढे जात राहायचं..न सापडणारी उत्तरं कितीही नाकारलं तरी आयुष्याच पार्ट आणि पार्सल असतात..जेवढ्या लवकर हे स्वीकारू तेवढं जगणं सुकर ..💯
_observation_based
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेलची माहिती उपलब्ध :
नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक
Last updated 1 month, 3 weeks ago
Subscribe करा आपला यूट्यूब चॅनेल
👇🏻
https://youtube.com/c/SPCreation1
Last updated 2 weeks, 6 days ago
Last updated 1 month, 1 week ago